Tuesday, May 3, 2022

परशुरामा अस्त्रं द्या

 अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:|

इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ||

मुखात चारही वेद...पाठीवर धनु ... हातात परशु....धारण केलेले भगवान परशुराम......... एकाच वेळी ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांची अनुभूती देणारी आपली प्रतिमा....मनाला एक विश्वास देते .......
भगवान विष्णूंचा सहावा अवतार घेवून आपण या भूतलावर प्रगटलात...... कां ? तर या पृथ्वीतलावर असलेल्या......... तपोभूमीवर.....कर्मभूमीवर....पुण्यभूमीवर...... कुणी धर्मकार्यात...राष्ट्रकार्यात......लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या...कर्मयोग्यांच्या कार्यात अडथळे आणणाऱ्या..... विद्रोही शक्तिंचा .....आपल्या शापवाणीने ....... वेळ आलीच तर....शस्त्रास्त्रांनी विनाश करण्यासाठीच हा अवतार नव्हे तर अधिकार आपल्याला मिळाला.......  आणि हो ....चिरंजीवीतेचं अनोखं वरदानही तुम्हाला प्राप्त आहे........होय आजही आपण या पृथ्वीतलावर कुठंतरी आहात ही आमची श्रद्धा आहे........ सद्य:स्थितीत......
या पुण्यभूमीत.......सत्तांध......धर्मांध.......वासनांध ......‌‌ स्वार्थांध....ल़ोकांचा...नव्हे...नव्हे ....दैत्यांचा अक्षरशः....हैदोस चाललाय् ....... तो आपल्या कुशाग्र दृष्टीने आपण पहात असालच.....या दुष्कर्मांनी ग्रस्त आणि त्रस्त झालेला हा......हा समाजपुरूष आक्रोश करतोय......याचना करतोय.... आणि विमनस्क स्थितीत ....साकडं घालतोय..... परशुरामा.......
आता अस्त्रं द्या.... फक्त एकदा शस्त्रें द्या.........
नि:पात ...करू देत आम्हाला.....या दुष्टप्रवृत्तींना नष्ट करू द्या आम्हाला त्यांचे रक्तांने.....घाणीने .....पापकर्मांनी बरबटलेले हात..... यासाठीच आम्हाला आता शस्त्रं हवे.....परशुरामाच्या हवे...........
       भृगुवंशीय ऋषी जमदग्नींचे तुम्ही पुत्रं........कठोर तपश्चर्येमुळे पुराणातील सप्तर्षी मध्ये त्यांना स्थान प्राप्त झालं........ अन्याय.... अत्याचार.... दुराचाराच्या...विरोधात पेटून उठणारे आपले पिताश्री जमदग्नीं........ आपल्या सदाचारी व पतिव्रता असलेली पत्नी रेणुकेला......गंधर्व क्रीडा पाहण्याच्या मोहात दुष्कर्म केलं म्हणून हत्या करण्याची आज्ञा त्यांनी केली.....पित्याची आज्ञा पाळण्याच्या कर्तव्यबुध्दीने ..... तुम्ही आपल्या मातेची हत्या केलीत....पण त्याचवेळी पित्याकडून वरदान मागून आपण मातेला व भावंडांना जीवदान दिले......नि:सीम मातृभक्तीचा हा आदर्श ही तुम्ही दिलात.....आपली माता आदिशक्ती रेणुका .....कठोर पतिव्रता..... तेवढीच थोर तपस्विनी..... कर्तव्यदक्ष माता .......आपले पती जमदग्नी यांच्याकडे कामधेनूची मागणी करणाऱ्या लोभी सहस्त्रार्जुनाने ती दिली नाही म्हणून त्यांची हत्या केल्यानंतर.....माता रेणुका यांनी माझा पुत्र २१ वेळा आपल्या क्षत्रिय कुळाचा वध करेल ....अशी शापवाणी केली .एवढंच नाही तर...दु:खाने शक्तीहीन  झालेल्या तुम्हाला श्री दत्तात्रेय चरणी अर्पण करून......पुन्हा एकदा बलशाली केले... अन् मातृवचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही पृथ्वी दुराचारी क्षत्रियहीन केली.........ही कर्तव्यकठोरता......ही मातृभक्ती आमचा आदर्श आहेच पण.......या तपोभूमीवरील दुराचाराचा.. नायनाट करण्यासाठी.... फक्त एकदाच...हे क्षात्रतेज आम्हाला द्या...परशुरामा अस्त्रं द्या........
   उत्पत्ती... स्थिती...... लय ...... यांचं प्रतिक.... ब्रह्मा, विष्णू,महेश आहेत......स्थिती प्रदान करणाऱ्या भगवान विष्णूंचे तुम्ही अवतार....विधायक,रचनात्मक कार्याचा आदर्श तुम्ही निर्माण केलात...लयकर्ता भगवान शंकरांनी तुमच्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून दुराचारी क्षत्रियांचा विनाश करून ....लोककल्याण करण्यासाठी तुम्हाला अस्त्रं दिले तेच परशुरामास्त्र.........आपण नेहमीच विधायक.... रचनात्मक कार्यातून या सृष्टीला स्थिरता प्रदान केली त्याचबरोबर.. विधायक कामात अडथळा आणणाऱ्या विघातक शक्तिंचा आपण बिमोड केलात....... आताही हीच वेळ आली आहे..... म्हणून म्हणतोय आता शस्त्रं द्या.....
          चिरंजीव परशुरामा ..बघताय ना आपण....सध्या सर्वत्र... जगातल्या धर्मांध शक्ती आणि त्यांना बळ देणारे सत्तापिपासू बेगडी धर्मनिरपेक्षता वादी....‌सत्तेपायी हिंदुत्वाला तिलांजली देवून आपल्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा ओढणारे सत्तापिपासू राजकारणी.....या भूमीतील मूळ असलेल्या हिंदुत्वालाच उखडून टाकण्याचे आव्हान आपल्या वागण्यातून .... बोलण्यातून रोज देत आहेत.....आमची श्रध्दास्थाने...आमच्या देवदेवता....आमचे सण उत्सव...आमचे राष्ट्रपुरुष यांच्यावर खुलेआम हल्ले करतायेत......पण आमचे सत्तांना राज्यकर्ते त्यांचा बिमोड करण्याऐवजी त्यांना संरक्षण देवून सच्च्या देशभक्तांना तुरुंगात डांबत आहेत........पुन्हा एकदा हिंदुत्वाला निष्प्रभ करण्याचं पाप ते करताहेत......सारं काही संतापजनक...भयावह....आहे.म्हणून म्हणतो.... हिंदुंना संघटीत होण्याची बुध्दी द्या.....शत्रुचा नायनाट करण्यासाठी शस्त्रं द्या......
       सामाजिक चित्रही निराशाजनक आहे......वासनांध पुरूष दिवसाढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अब्रूंचे लचके तोडत आहेत......हे कुकर्म करूनदेखील निर्लज्जपणे समाजात उजळमाथ्याने वावरतायत सामान्य माणूस मूक होवून हताश उसासे सोडत बसलाय..... न्यायाच्या प्रांगणात त्याच्यावर अन्यायच होतो आहे.......हीच स्थिती स्वार्थांध झालेल्या राज्यकर्त्यांची आहे......डोळे ...कान....मनाची कवाडं बंद करून .....केवळ आपल्याच आप्तांच्या तुंबड्या भरण्यासाठी हे भ्रष्ट नेते बेधुंद झाले आहेत......त्यांना आवर घालू पाहणाऱ्या सरकारी यंत्रणांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणचे धाडस हेच भ्रष्टाचारी करताहेत .........त्यात भर म्हणून आपल्या प्रभावासाठी एक दिलाने राहणाऱ्या सर्व समाजात .........जातीयतेचे विष पेरण्याचे काम काही जाणते म्हणविले जाणारे जात्यांध नेते करत आहेत.....सर्व समाज एक सूत्रात बांधण्यासाठी ........आम्हाला शक्ती द्या...हे भगवान आम्हाला शस्त्रं द्याच......
      हे परशुरामा,...पुण्यकर्मावर पापकर्माने.....सदाचारावर दुराचाराने.....सज्जनांवर दुर्जनांनी.......देशभक्तांवर देशद्रोह्यांनी..... देवांवर दैत्यांनी... अवैध मार्गाने नेहमीच आक्रमण केले आहे.....पण या मूठभर अपप्रवृत्तींवर आपल्यातल्याच ब्रह्मतेज व क्षात्रतेजाने आपले शास्त्र आणि शस्त्रं वापरून  त्यांचा समूळ नाश केला आहे.... विधायक कामं करणाऱ्यांना या भूमीत नेहमीच उपहास उपेक्षा अवहेलनांना सामोरं जावं लागलं आहे...... आपणही याला अपवाद नाहीत....हे भगवन् रचनात्मक कार्याचे प्रेरक तुम्ही आहातच.... त्याचबरोबर या भरतभूमीचे संरक्षक म्हणून आम्हा सर्वांचे उपास्य दैवत तुम्ही आहात.......
हिंदी कवी रामधारीसिंह दिनकर ' परशुराम की प्रतिक्षा ' या खंडकाव्यात एका ठिकाणी लिहीतात
जबतक प्रसन्न यह आनंद सगुण हॅंसते है
है जहाँ खडग् ,सब पुण्य वहां बसते है ||
वीरता जहांपर नहीं पुण्य का क्षय है
वीरता जहांपर नहीं स्वार्थ की जय हैं ||
हीच प्रेरणा,हाच आत्मविश्वास,हेच वरदान या विराट परशुराम स्वरूप हिंदू समाजाला द्या हे परशुराम ... आम्हाला शास्त्र न तर द्याच पण शस्त्रं ही द्या.......
                    जय परशुराम !
                                         शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                                                      ९५२७१५३९२५

No comments:

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...